Wednesday 7 December 2016

आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा (मराठी)

. . . अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल विश्लेषण करण्यापूर्वी पाश्चिमात्य जडवादी nihilists किंवा हिन्दुत्वामधल्या मध्वाचार्यांच्या द्वैतवादाच्या समर्थकांची एक मूलभूत शंका दूर करावी लागते. "जे दिसतं तेच खरं, बाकी न दिसणारं सर्व काही निरर्थक आहे" असं मानणारे नास्तिक जडवादी आत्म्याच्या अस्तित्वाचा वस्तुनिष्ठ पुरावा मागतात. सगुण भक्तीमधे जास्त विश्वास ठेवणारे मध्वाचार्य द्वैतवादीही अशीच भूमिका घेतात.
. . . आता आत्म्याच्या अस्तित्वाचा वस्तुनिष्ठ पुरावा देणं शक्य आहे का ? आहे. गणितीय परिभाषेमधून आत्मा आणि चैतन्य समीकरणाच्या स्वरूपात मांडता येऊ शकतं. त्यासाठी प्रथम "व्यक्त" जग आणि "अव्यक्त" जग म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे. व्यक्त जग हे जडवाद्यांचं असतं. इंद्रियगोचर अनुभवातून जे जाणता येतं तेच निखळ वास्तव किंवा अंतिम सत्य ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. ह्याउलट अव्यक्त जग हे आत्म्याचं अस्तित्व मानणा-या अद्वैतवाल्यांचं जग असतं. अद्वैतवाल्यांच्या मते जडवादी हे मायेच्या प्रभावाने बद्ध असतात. त्यामुळे मनास येईल ते करायला जडवादी स्वतंत्र नसतात. प्रकृतीचे नियम जडवाद्यांना उल्लंघता येत नाहीत :
 कार्यते हि अवशः कर्मः सर्वः प्रकृतिजैर्गुणैः|
. . . एखादी व्यक्ती ही जडवादी आहे की तत्त्ववादी आहे हे केवळ त्या व्यक्तीने आयुष्यात केलेल्या पर्याय-निवडीवरच अवलंबून असतं असं नाही. तर व्वस्थेच्या उतरंडीवर ती व्यक्ती कुठे आहे ह्यावरही ते अवलंबून असतं. व्यावहारिक जगाचा ह्या सगळ्याशी घनिष्ठ संबंध आहे. तो कसा ते आता पाहूया.
. . . आपल्याला आवडो अथवा न आवडो पण आपण सर्वजण "बळी तो कान पिळी" अशा व्यवस्थेच्या उतरंडीचा हिस्सा असतो. सर्वात बलवान व्यक्ती अत्युच्च स्थानी तर सर्वात दुर्बत व्यक्ती ही नीचतम स्थानावर असते. वरचा मोठा मासा खालच्या माशाला गिळू शकतो. इथे बलवान आणि दुर्बल असणं हे केवळ शारीरिक सामर्थ्यावरच अवलंबून असतं असं नाही. तर व्यवस्थेमधले कितीजण त्या व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारतात ह्याकरही ते अवलंबून असतं. ह्याचाच अर्थ सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला १००% जनसमर्थन असतं तर सर्वात तळाशी असलेल्या व्यक्तीला ०% जनसमर्थन असतं. जर ही व्यवस्थेची उतरंड व्यक्तींच्या ज्ञानभांडाराशी किंवा कौशल्यांशी सुसंगत असती तर ती तर्कनिष्ठ उतरंड ठरली असती. पण सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला व्यवस्थेची सर्व संसाधनं उपलब्ध असतात. त्याखालील स्थानांवरील व्यक्तींना मिळणारी संसाधनं क्रमाक्रमाने कमी होत जातात. त्यामुळे गटबाजी आणि वशिलेबाजीला जोर येतो. उच्च स्थानावरील व्यक्ती स्वतःच्या वशिल्याच्या तट्टांना वर खेचून घेतात आणि नको असलेल्या व्यक्तींना खाली ढकलून देतात. त्यासाठी कितीही संसाधनं लागली तरी त्याची फिकीर त्यांना नसते. कारण त्यांना स्वतःच्या खिशातली संसाथनं वापरावी लागत नाहीत तर व्यवस्थेमधली संसाधनं वापरूनच ते व्यवस्थेला "आहे रे" (Haves) आणि "नाही रे" (Have nots) अशा विषमतेकडे ढकलत रहातात. व्यवस्थेच्या तळाशी संसाधनंच नसल्यामुळे दुर्बल आणखी दुर्बल बनत जातो तर उच्च स्थानावरचे बलवान अधिकाधिक बलशाली होत जातात. अशी "बळी तो कान पिळी" ही व्यवस्था "न्याय" किंवा Justice शी सुसंगत नाही. JUSTICE ह्या संकल्पनेचा मूलाधार हा "सामाजिक करार" मधे आढळतो. ह्या कराराचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की कोणत्याही व्यक्तीकडे बदला घेण्याची किंवा प्रतिकार करण्याची क्षमता नसतांना तिला विनाकारण अन्याय सहन करावा लागू नये. (संदर्भ: प्लेटोच्या "रिपब्लिक" भाग २ मधील ग्लौकन् चं भाषण). दुस-या शब्दांत सांगायचं तर एकूणच व्यवस्था ही संख्याबळाच्या आधारावर समाजातील कोणत्याही व्यक्तीवर "कायमस्वरूपी पराभूत" असा शिक्का मारू शकत नाही.
. . . पण व्यवस्थेच्या उतरंडीवर निरंतर खाली ढकलल्या गेलेल्या, नीचतम स्थानावरच्या  व्यक्तीकडे संसाधनं नसतात आणि त्या व्यक्तीच्या भोवतालच्या प्रत्येकाने स्वतःचा फायदा वाढावा ह्यासाठी त्या तळातल्या व्यक्तीबरोबरची नाळ तोडून टाकलेली असते. अशा परिस्थितीत त्या तळातल्या व्यक्तीने अन्यायाचा प्रतिकार करायचा तरी कसा ?
. . . अशा तळातल्या व्यक्तीकडेही अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता असावी ह्यासाठीच आपली व्यवस्था मानवी अस्तित्वाचं देह आणि आत्मा असं द्विस्तरीय विश्लेषण करते. उतरंडीच्या वरच्या स्थानांवर असणा-या जडवाद्यांचे देह हे अधिक बलशाली असतात. त्या तुलनेत त्यांचा आत्मा हा प्रभावहीन असतो. प्राचीन कणशास्त्रज्ञ कणाद मुनी ज्या कणविज्ञानाचा अभ्यास करायचे त्या कणविज्ञानानुसार म्हणजेच particle physics प्रमाणे अशा जडवाद्यांना Fermions म्हणून संबोधलं जातं; कारण असे कण हे Dirac-Fermi समीकरणांप्रमाणे वागतात. ह्याउलट उतरंडीच्या तळाजवळ असलेल्या व्यक्तींचे देह हे दुर्बल असतात पण त्यांचा आत्मा हा जास्त प्रभावशाली असतो. कणविज्ञान अशा तत्त्ववाद्यांना Bosons म्हणून संबोधतं. कारण असे तत्त्ववादी कण हे Bose- Einstein समीकरणांनुसार वागतात. ह्या सगळ्यातून असा निष्कर्ष मात्र कुणीही काढू नये की "Ice World किंवा पितृसत्ताक पद्धतीतले कण म्हणजे जडवादी आणि Fire World किंवा मातृसत्ताक पद्धतीतले कण  म्हणजे तत्त्ववादी". तुम्ही व्यक्त जगात रहाणार की अव्यक्त जगात रहाणार हे व्यवस्था/system तुम्हांला किती स्वीकारते किंवा नाकारते ह्यानुसार ठरतं.
. . . आत्मा म्हणजे काय ते गणितीय परिभाषेत जाणून घेतल्यावर आता आपल्याला परमतत्त्व किंवा चैतन्य म्हणजे काय ते गणितीय परिभाषेत समजून घेता येईल. Fermions हे Pauli's exclusion principle नुसार चालतात. पण Bosons ना हे Pauli's exclusion principle लागू होत नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी Bosons ची घनता किती असावी ह्याला कसलीही मर्यादा नाही. अशा पद्धतीने Bosons चा अखंड विस्तार (expanse) तयार होऊ शकतो. ह्या अखंड विस्तारालाच परमतत्त्व म्हणता येतं.
. . . दुर्बल देहवाल्या Bosons चं नेमकं महत्त्व काय? तर एक Boson हा दोन Fermions मधे प्रक्रिया घडवून त्या दोन्ही Fermions ना neutralise (उदासीन) करू शकतो. म्हणजेच व्यक्त जगातल्या जुगारावर Bosons नियंत्रण ठेऊ शकतात, जुगाराचा परिणाम कोणत्याही दिशेला वळवू शकतात. US elections 2016 मधे हिलरी क्लिंटनचा झालेला पराभव हे त्याचंच एक उदाहरण आहे. अमोरिकन निरीश्वरवाद्यांना विशेषतः nihilist गटाला अजूनही ह्यामागची कारणमीमांसा समजलेली नाही !!!